Blogroll

दशहरा का साजरा केला जातो? Dussehra information in Marathi

"Dussehra information in Marathi"दसरा हा सण हिंदू धर्मामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. त्या दिवशी एकमेकांना शुभकामना दिल्या जातात. नवीन कपडे या सणानिमित्त खरेदी केले जातात तसेच सोने-चांदी देखील या सणानिमित्त खरेदी केले जातात. घराला आंब्याच्या पानांची व झेंडूच्या फुलांचे तोरणे लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्र, वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात.

Dussehra information in Marathi


संध्याकाळी सोने लुटण्याची प्रथा आहे. म्हणजेच आपट्याची पाने लुटण्यासाठी गावाची वेश ओलांडून जात असतात. दसरा हा सण साजरा करण्याची परंपरा खूप जुनी आहे. याच दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला होता. प्रभुरामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले होते. पांडव ही अज्ञातवासात राहण्याकरिता यावेळी गेले होते, त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर तेथे त्यांनी परत ती शस्त्रे घेतली व त्या झाडाची पूजा केली. तो हाच दिवस आहे.



आपट्याची पाने सोने वाटण्याची परंपरा


दसर्‍याच्या दिवशी इष्टमित्रांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या-नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत. नंतर देवाला आणि वडिलधारी व्यक्तींना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत. या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे, असा एक मतप्रवाह आहे.


आपट्याच्या पानांचे धार्मिक महत्त्व


आपट्याला शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा आहे. दसर्‍याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायूमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. आपट्याची पाने ही आप व तेज या कणांशी निगडित असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्त्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात व जेव्हा या आपट्यांच्या पानांचे आदान-प्रदान होते, त्या वेळी हे तेजतत्त्वरूपी कण आपट्याच्या पानातून जिवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. यामुळे जिवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते ते आवश्यक तत्त्व जिवाच्या सूक्ष्मदेहापर्यंत आपकणांच्या साहाय्याने झिरपले जाते. या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसर्‍याच्या दिवशी वायूमंडलाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्याच्या पानांतून तेजतत्त्व एकमेकांना प्रदान करून ईश्‍वरी राज्य स्थापनेला लागणारा क्षात्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा, असे सांगितले जाते.



दशहरा का साजरा केला जातो?


दैत्य राजा रावणावर भगवान रामाच्या विजयाच्या स्मरणार्थ दसरा साजरा केला जातो. ही महाकाव्य लढाई वाईटावर धार्मिकतेच्या विजयाचे प्रतीक आहे. दिव्य ज्योत शाळेत, आम्ही नैतिक मूल्ये आणि नैतिकतेच्या महत्त्वावर भर देतो, दसरा हा स्किट स्पर्धा, नृत्य इत्यादी उपक्रमांद्वारे या तत्त्वांना बळकट करण्यासाठी एक योग्य प्रसंगी बनवतो.'Dussehra information in Marathi'


भारताच्या अनेक भागांमध्ये, नवरात्रीच्या समाप्तीसोबत दसरा येतो, देवी दुर्गाला समर्पित नऊ रात्रीचा उत्सव. महिषासुर या म्हशीच्या राक्षसावरचा तिचा विजय स्त्रीत्वाची शक्ती आणि अडथळे दूर करण्याचे प्रतीक आहे.


रावण, मेघनाद आणि कुंभकर्ण यांच्या पुतळ्यांचे दहन ही दसऱ्याच्या सर्वात विशिष्ट परंपरांपैकी एक आहे. हा विधी वाईट शक्तींच्या नाशाचे प्रतीक आहे.


दहा दिवस चाललेल्या महाकाव्य युद्धानंतर, भगवान रामाने, भगवान हनुमान आणि त्याच्या निष्ठावान सैन्याने मदत केली, रावणाचा पराभव केला, जे वाईटावर धार्मिकतेच्या विजयाचे प्रतीक आहे . रावणाच्या पराभवाचा दिवस, जो आश्विन महिन्याच्या तेजस्वी अर्ध्याचा 10 वा दिवस आहे, तो दसरा म्हणून साजरा केला जातो.



दसरा 10 दिवस का साजरा केला जातो?


दहा दिवस चाललेल्या महाकाव्य युद्धानंतर, भगवान रामाने, भगवान हनुमान आणि त्याच्या निष्ठावान सैन्याने मदत केली, रावणाचा पराभव केला, जे वाईटावर धार्मिकतेच्या विजयाचे प्रतीक आहे . रावणाच्या पराभवाचा दिवस, जो आश्विन महिन्याच्या तेजस्वी अर्ध्याचा 10 वा दिवस आहे, तो दसरा म्हणून साजरा केला जातो.

 जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरू नका आणि अधिक नवीनतम माहिती साठी भेट द्या Techy Space 






Post a Comment

0 Comments